उड जायेगा हंस अकेला
जग दर्शन का मेला, .
जैसे पात गिरे तरुवरसे,मिलना बहुत दुहेला
।
ना जानू किधर गिरेगा, लग्या पवन का रेला ।
जब होवेगी उमर पूरी,जब छूटेगा हुकम हुजूरी;
जम
के दूत बडे मजबूत, जम से पडा झमेला।
दास
कबीर हर के गुण गावै,वा हर को पार न पावै;
गुरू
की करनी गुरु जावैगा; चेले की करनी चेला:
उडजायेगा, हंस अकेला.
उड जायेगा हंस अकेला
जग दर्शन का मेला, .
कबीर महाराज या भजनात
चेतावनी तर देतातच आहेत पण मुख्यत्वे करून वस्तुस्थिती सांगत आहेत. ते म्हणतात की
उड जायेगा हंस अकेला....म्हणजे जेव्हा जीव/ प्राण / चैतन्य शरीराला सोडुन जातं
तेव्हा ते एकटंच जातं, इथे जगात असतं तेव्हा त्या बरोबर हे पंच कोषात्मक शरीर
असतं, मन बुद्धी अहंकार सगळं असतं पण जेव्हा मृत्यु येतो तेव्हा हे शरीर
इथेच सोडून जायचं असतं. तो जीव ...हंस... मन बुद्धी अहंकार घेऊन निघून जातो. ते म्हणतात की जगात येऊन फक्त बघायचं काम करायचय.मन बुद्धी अहंकार हे सर्व वापरावे लागतात पण .. जग हे एक मेळ्या प्रमाणेच आहे. तिथे जाऊन आपण नवीन नवीन गोष्टी , सजावट, नव्या जुन्या प्रकारचे खेळ, जादूचे प्रयोग, इ. नुसतं बघतो, कधीतरी काही विकत घ्यावेसे वाटले तर विकत घेतो, आपली म्हणून घरी नेतो, त्या सगळ्यात आपण आपला जीव ओततो, पण यात काहीच अगदी आपल्याला असे काहीच मिळत नाही. पारमार्थिक दृष्टीने आपण रिकामेच राहातो. सगळं जिथल्या तिथेच राहाते. इथे, या जगात जे मिळवले ते इथेच सोडून जावे लागते. इथे फक्त बघणे होते, मनावर ज्या गोष्टी बिंबतात त्याचे तेव्हढेच ठसे बरोबर जातात. म्हणून कबीर महाराज म्हणतात की जग दर्शन का मेला....
जैसे पात गिरे तरुवरसे,मिलना
बहुत दुहेला ।
ना जानू किधर गिरेगा, लग्या
पवन का रेला ।
जैसे पात गिरे तरुवर से... म्हणजे झाडाचे पान पिकल्या
वर वृक्षाच्या फांदीला सोडून देते आणि नंतर ते पान पुन्हा सापडायला खूप अशक्य
असते, दुहेला म्हणजे अशक्य. मिलना बहुत दुहेला. ना जाने किधर गिरेगा...
कोणास ठाऊक कुठे जाऊन पडेल कारण खूप वारा सुटला आहे. मृत्यु नंतर जसं पान झाडाला
सोडून देतं तसंच जीव शरीराला सोडून देतं. आणि ते पुन्हा कुठे जाऊन जन्मास येईल हे
काही आपल्याला माहीत नसतं. आपापल्या कर्मा प्रमाणे .... जिथे कुठे आपल्या कर्मांचा
निचरा होणार असेल, त्या जन्मीचं allotted प्रारब्ध कर्म काय असेल त्या प्रमाणे, संस्कारां प्रमाणे,
जीव पुन्हा जन्म घेईल. म्हणून ना जाने किधर गिरेगा... कारण पवन का रेला
म्हणजे आपल्या कर्माची, संस्काराची आंधी (ईश्वराच्या इच्छेप्रमाणे) कुठे नेऊन
सोडेल माहीत नाही.
जब होवेगी उमर पूरी,जब छूटेगा हुकम हुजूरी;
जम
के दूत बडे मजबूत, जम से पडा झमेला।
कबीर महाराज म्हणतात की
जेव्हा आपली उमर पूरी होते म्हणजे या जन्मीचे आपले कर्म संपले, घेवाण देवाण
संपली की आपली उमर पूरी होईल, जेव्हा हुजूर म्हणजे ईश्वर चा
हुकुम होईल की चला आता, जब छूटेगा हुकुम हुजूरी तेव्हाच आपण हा देह सोडू शकतो. आणि ते म्हणतात
की तो न्यायला जर यमाचे दूत आलेत ... तर आपल्याला ते अगोदरच सांगत आहेत की जम
के दूत, बड़े मजबूत ते जे यमदूत असतात ते खूपच मजबूत असतात म्हणजे तिथे काही कोणाचे
चालत नाही, त्याचे सगळे मुकाट्याने ऐकावे लागते. खरे असे आहे की यम हा धर्म असतो म्हणजे तिथे धर्माविना गोष्टच घडत नाही, कधी ही अन्यथा घडतच नाही... तिथे कोणाचे
शिफारस किंवा बेशिस्त पणा चालत नाही. एकदा का पाप पुण्य किंवा कहीही ज्या गोष्टीचा
कुणावर , आपल्यावर सुद्धा परिणाम होतो ते register होतं, आपल्या कोशांवर imprint होतं आणि त्याचा हिशोब
द्यावाच लागतो, ते सुख अथवा दुःख जिथल्या तिथे भोगून संपवावं असं सांगितलं
जातं..... परिणाम भोगावेच लागतात. भोगताना पुन्हा चिडचिड करून नवीन कर्म जमवले तर
ते भोगावे लागतात. निष्काम कर्म ह्याच साठी सांगितलं जातं, किंवा केलेलं सगळं
ईश्वरार्पण बुद्धीने करावं असे सांगतात.
दास
कबीर हर के गुण गावै,वा हर को पार न पावै;
गुरू
की करनी गुरु जावैगा; चेले की करनी चेला:
हरीचा दास कबीर आहे ते
म्हणतात की मी तर त्या अनंत हरी चे गुण सतत गातोय तरी मला त्या हरीचा पारच नाही
लागत. हरी जो की अनंत , अमर्याद, असीम असा आहे, तेच निरंजन आहे त्यालाच ते हरी
म्हणत आहेत आणि त्या निरंजनाचा कधी कोणाला पार लागू शकतो का, नाहीच लागू शकत.
त्याच्याच इच्छे प्रमाणे होत असतं.
किती ही मोठे गुरू असतील
तरी त्यांच्या करणी प्रमाणे त्यांना मिळेल आणि शिष्याच्या करणी प्रमाणे शिष्याला
मिळेल. तिथे कोणी कोणाला देऊ घेऊ शकत नाही.
गुरूवर शिष्याचा जितका
भरवसा असेल त्या भरवश्या प्रमाणे शिष्याची अनेक पटीने आध्यात्मिक उन्नती होऊ शकते.
बाबाजींनी एक गोष्ट सांगितली होती ..... शिष्या ने एकदा
२.. पत्थर को पूजोगे तो
उसमे भी भगवान प्रगट होते हैं.. जो ज्या भावाने करेल त्या भावाला परम गुरू
तत्वाकडून उत्तर मिळतं. म्हणुन म्हणतात की
गुरूकी करनी गुरुजायेगा...चेलेकी करनी चेला
कबीर महाराज म्हणतात माझ्या
सद्गुरूंनी मला जे नाम, सुमिरन करायला शिकवले आहे ...तेच मला साधन दिलय, सत्त ला
जाणायला शिकवले आहे, सत्त नामावर विश्वास ठेवाय चा म्हणजे काय करायचे ते माझ्या अंतरंगात उतरवले आहे. ... सांगितले आहे... हे जे माझे साधन
आहे ते माझ्या अंतरंगात उतरवलं आहे किती हितकारी आहे हे मला उमजले आहे. जे साधन आहे त्याचा मी दास बनून आहे, ते निरंतर चालू राहणार.
या भजनात कबीर महाराज म्हणत आहेत की जीव शरीराला सोडून निघून जाईल...
बोलावणं आलं की जाणार, म्हणून आता शरीरात
जीव आहे तोवर जे करायचे ते करून घ्या, ईश्वर दर्शन्, मिलन घडवून घ्या. सत्गुरूला
ओळखा, त्यांचे सबद ग्रहण करा, जिवंत पणीच जे करायचे ते करा...नंतर काही ही करता
येणे शक्य नाही.
उडजायेगा, हंस अकेला.
No comments:
Post a Comment